Proizvod vam ne odgovara? Nema veze! Možete nam vratiti unutar 30 dana
S poklon bonom ne možete pogriješiti. Za poklon bon primatelj može odabrati bilo što iz naše ponude.
30 dana za povrat kupljenih proizvoda
मृत्यू ज्यावेळेस आपल्या दाराशी उभा असतो, त्यावेळेस जिवंत असण्याच्या आणि मृत्यूच्या मधलं अंतर अनुभवणं नेमकं काय आणि कसं असू शकतं हे ऋषिकेशने अशा प्रकारे मांडलेलं आहे की वाचकाला देखील त्या घालमेलीची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. ऋषिकेशचा हा १७ दिवसांचा प्रवास फारच 'डार्क' आहे, पण त्याच्या झगड्याच्या पहिल्या दिवसापासून ते अखेरपर्यंत या काळ्याकुट्ट अंधाराच्या भोवती असलेली चंदेरी किनार आपलं अस्तित्व दाखवल्याशिवाय राहत नाही. १७ दिवस म्हणजे ऋषिकेशच्या आयुष्यातील भयावह दिवसांचं नुसतं वर्णन नाहीये तर त्या मरणप्राय यातनांमध्ये त्याला काय गवसत गेलं याची अनुभूती आहे. काही काही पानांवर तर त्यानं मांडलेलं आत्मज्ञान हे वाचन थांबवून चिंतन करायला लावतं... अंतर्मुख व्हायला लावतं आणि ही काळकोठडी कशी त्याच्या गाभ्याशी असलेल्या आत्मप्रकाशाला प्रज्वलित करते याचं दर्शन घडवते. (डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रस्तावनेमधून)